22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeKokanशेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक असणाऱ्या संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या दोन्ही मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. उन्हाळी सुट्टीला गावी आलेल्या भाच्यासह संतोष पाटील यांची दोन्ही मुलं श्रीवर्धन तालुक्यातील वेळास बीचवर फिरायला गेले होते. तेव्हा खोल पाण्यात लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले आणि बुडाले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष पाटील यांच्या बहिणीचा मुलगा ऐरोली इथून गावी आला होता. त्याच्यासोबत संतोष पाटील यांची दोन्ही मुलं वेळास बीचवर गेले. बीचवर तिघेही पोहायला समुद्रात उतरले असताना मोठ्या लाटांसोबत ते समुद्रात ओढले गेले. तिन्ही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्यानं संतोष पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतोष पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी नवी गाडीही घेतली होती. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं. पण आता तीन मुलांच्या अशा मृत्यूने पाटील कुटुंब दुःखाच्या सागरात बुडालंय. पाटील यांचे म्हसळा तालुक्यातल्या गोंडघर इथं घर संतोष पाटील यांची मयुरेश आणि अवधुत ही दोन मुलं भाचा हिमांशूसोबत वेळास बीचला गेले होते. हिमांशू मुंबईत राहत असून सुट्टीनिमित्त तो गावी आला होता. तिघांचेही वय २१ ते २६ वर्षे इतकं आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेत.

RELATED ARTICLES

Most Popular