21.4 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeRatnagiriआंबा, काजू विम्यासाठी ३० नोव्हेंबर मुदत - कृषी विभाग

आंबा, काजू विम्यासाठी ३० नोव्हेंबर मुदत – कृषी विभाग

खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू आहे.

फळपिकांकरिता पीकविमा योजना पुढील आर्थिक वर्षासाठी जाहीर झाली असून, त्यामध्ये आंबा, काजूचा समावेश आहे. याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. मागील वर्षाचा विमा परतावा जिल्ह्यातील २४ हजार बागायतदारांना मिळालेला नाही; मात्र नवीन विम्यासाठी हप्ता भरावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.

शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. येत्या आंबिया बहारासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित कालावधीत फळबागांना विमा सरंक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे.

खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही योजना लागू आहे. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये व विमा हप्ता १३ हजार ३०० रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये व विमा हप्ता ५ हजार रुपये आहे. हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग आर्द्रता आदी माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते.

RELATED ARTICLES

Most Popular