24.2 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeLifestyleगरज असते ती एका प्रेमळ “मिठीची”

गरज असते ती एका प्रेमळ “मिठीची”

नकारात्मक प्रसंगानंतर एखाद्याला मिठी मारल्याने माणसाला बरे वाटते, असे म्हटले जात होते.

एखाद्या कठीण प्रसंगात तुम्हाला कोणी मिठी मारली तर तणाव कमी जाणवतो. संशोधनात असे दिसून आले आहे की हे स्त्रियांच्या संदर्भात अधिक घडते. ७६ लोकांवर केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की जेव्हा एखादी महिला तिला मिठी मारते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनचे उत्पादन कमी होते. माणसाला मिठी मारून हे होत नाही. कठीण आणि गरजेच्या वेळी दिलेला मानसिक आधार हा सर्वांसाठीच खूप गरजेचा असतो.

२०१८ मध्ये असेच संशोधन करण्यात आले होते. नकारात्मक प्रसंगानंतर एखाद्याला मिठी मारल्याने माणसाला बरे वाटते, असे म्हटले जात होते. शास्त्रज्ञ असेही सांगतात की मिठी मारण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला त्याची गरज आहे की नाही हे समजून घ्या, कारण मिठी मारण्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीची स्थितीच सांगू शकेल. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल नेचरमध्ये प्रकाशित झाले आहेत.

संशोधनानुसार यामागे सामाजिक कारणही असू शकते. बर्याच पुरुषांना मिठी मारणे तितकेसे चांगले वाटत नाही, कारण ते पुरुषांसाठी सामाजिकदृष्ट्या असामान्य किंवा विचित्र मानले जातात. दुसरे कारण स्त्री आणि पुरुष यांच्यातील स्पर्श देखील असू शकते.

अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. संशोधकांच्या मते, कॉर्टिसोलचा स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तणावपूर्ण काम करणे आणखी कठीण होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमाने मिठी मारते तेव्हा ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. हे कॉर्टिसोलचा प्रभाव कमी करते. त्यामुळे संजय दत्तच्या चित्रपटामध्ये दाखवलेली जादूची झप्पी मात्र खूपच परिणामकारक असल्याचे वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular