22.2 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeRatnagiriएक रुपयात पीक विमा योजना - जिल्हाधिकारी देवेंदर सिंह

एक रुपयात पीक विमा योजना – जिल्हाधिकारी देवेंदर सिंह

या योजनेंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.

शासनामार्फत खरीप हंगाम २०२३ मध्ये केवळ १ रुपया प्रतिअर्ज या दराने सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिलेली आहे. केवळ एक रुपया भरून यामध्ये सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये नाचणी व भात या दोन पिकांचा या योजनेमध्ये समावेश होतो. या योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात भातशेतीचे क्षेत्र ७९ हजार हेक्टर आहे.

त्यापैकी ६८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भात उत्पादन घेणारे शेतकरी आहेत तर १० हजार ३९८ हे हेक्टर क्षेत्रावर नाचणी घेत असलेले शेतकरी आहेत. ते या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा, ८ अ, आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत व पीक पेराबाबत स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. ही कागदपत्रे घेऊन जवळच्या सामान्य सुविधा केंद्रावर जाऊन एक रुपयामध्ये आपला पीक विमा उतरवू शकतात. या योजनेंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते.

जोखमीच्या हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामात हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, पीकपेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग पडल्यास भरपाई मिळणार आदी कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा मिळणार आहे. जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ही विमा कंपनी नियुक्त केली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे.

RELATED ARTICLES

Most Popular