27.3 C
Ratnagiri
Sunday, June 1, 2025

गुटखा वाहतूक करणारी गाडी चिपळुणात पकडली

मुंबई - गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी...
HomeMaharashtraविधानभवन परिसरात विरोधक X सत्ताधारी भिडले !

विधानभवन परिसरात विरोधक X सत्ताधारी भिडले !

औरंग्याचा धिक्कार करत शिवसेना आमदारांनी कबर हटवण्याची मागणी केली.

छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर छळ करणाऱ्या औरंग्याची कबर तातडीने हटवावी अशा घोषणा लिहिलेले फलक झळकावत सत्तारूढ शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विजय शिवतारे, संतोष बांगर, डॉ. मनीषा कायंदे, संजय गायकवाड यासह अनेक आमदार सहभागी झाले होते.

कबर हटवण्याची मागणी – त्यावेळी औरंग्याचा धिक्कार करत शिवसेना आमदारांनी कबर हटवण्याची मागणी केली. औरंग्याची कबर हटवून तिथं केवळ थडगं ठेवा आणि थडग्याजवळ चार जोडे ठेवावेत. म्हणजे येणारे जाणारे थडग्याला जोडे मारतील, अशी मागणी यावेळी ना. भरत गोगावले यांनी केली. औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी आ. संतोष बांगर यांनी केली. शंभू राजांचा अमानूष छळ करणाऱ्या औरंग्याची कबर उखडून टाका असे बॅनरही यावेळी शिवसेना आमदारांनी झळकवले,

विरोधक भिडले – त्यावेळी विरोधी पक्षाचे आमदार त्या ठिकाणी आले आणि त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. शांतता प्रिय महाराष्ट्र हवा. दंगलमुक्त, राज्यात द्वेष पसरवणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या. दंगल नको शांतता हवी. नागपूरला प्रकरणी कारवाई करा अशा घोषणा देत विरोधकांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. दोन्ही कडून घोषणा सुरू झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच ठसन पहायला मिळाली. सोमवारी नागपूर येथे झालेल्या हिंसाचारावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ना. नितेश राणे हे समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत त्यांची हकालपट्टी करा या आशयाचे बॅनर्स विरोधकांनी झळकविले आणि त्यावेळी विधानसभा परिसर मंगळवारी चांगलाच तापला. नागपूर प्रकरणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असून, विधानसभेतही मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला.

सरकारच्या अपयशाचे प्रतिक – विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना म्हणाले, हिंसाचार सरकारच्या अपयशाचे प्रतिक आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. सरकार आपली जबाबदारी झटकत असून, सांप्रदायिक तणाव वाढवण्याचे काम करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला.

सत्ताधाऱ्यांचे उत्तर – तर, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, काही लोक जाणूनबुजून औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत, त्यामुळे राज्यात असंतोष आणि तणाव वाढत आहे. राज्याच्या शांततेला आणि ऐक्याला बाधा पोहोचवणाऱ्या या वक्तव्यांमुळे हिंसेचे वातावरण तयार होत आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular