पक्ष बांधणीच्यादृष्टीने आज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे; परंतु समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. स्थानिक पातळीवर तसे निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने दिले आहेत, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर यांनी मांडली. येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस निरीक्षक शशांक बावचकर, हुस्नबानू खलिफे, दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद आणि समन्वयक सुरेश कातकर यांची उपस्थिती होती. पक्षाची रणनीती आणि राज्यातील व स्थानिक प्रश्नांवर भाष्य करताना रमेश कीर म्हणाले, “संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकत्यांची मोट बांधणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करून मार्गदर्शन करणे, आगामी निवडणुकांसाठी त्यांची तयारी करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. सध्या कार्यकर्त्यांची मानसिकता वेगळी आहे आणि त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. देशात चाललेल्या ‘दडपशाही’ला विरोध करण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधणे गरजेचे आहे.
राज्यात अनेक भागांत महापुराने जमिनीची धूप झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरीही राज्य सरकार केवळ पंचनाम्यावर अडकून पडले आहे. राज्य सरकार असंवेदनशील आहे. लोकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने घोषणा करावी. तत्काळ मदतीची रत्नागिरीतील स्थानिक प्रश्नांवर बोलताना कीर म्हणाले, “स्थानिक समस्या ‘जैसे थे’ आहेत. कार्यकत्यांनी लोकांपर्यंत पोहोचून स्थानिक प्रश्नांविषयी लोकांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रश्नांबाबत काँग्रेस पक्ष म्हणून वेळोवेळी उपोषण आणि येथील शासकीय अधिकाऱ्यांचादेखील पाठपुरावा करत आहे. मात्र, पालकमंत्री विकासात इतके गुंग आहेत की, त्यांना रस्त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही, असा उपरोधिक टोला रमेश कीर यांनी लगावला. १०
प्रशिक्षण शिबिरातून निवडणुकीची रणनीती – रत्नागिरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे या उद्देशाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि मते विचारात घेतली जातील. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरविली जाईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. देशाच्या भविष्यासाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी त्यांच्या लढ्याला तरुणांनी खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे. तरुणांनी त्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असे निरीक्षक शशांक बावचकर यांनी सांगितले.