22.1 C
Ratnagiri
Wednesday, December 3, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriनियम मोडणाऱ्या ५५ हजार जणांना दंड, जिल्हा वाहतूक पोलिस

नियम मोडणाऱ्या ५५ हजार जणांना दंड, जिल्हा वाहतूक पोलिस

गेल्या वर्षात वाहतूक पोलिसांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे महामार्गावर तसेच शहर आणि गावातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. वाहनांचे अपघात घडू नयेत यासाठी वाहतुकीचे नियम बनवलेले आहेत. हे नियम मोडणाऱ्यांना शिक्षा किंवा दंड करण्याची तरतूद आहे; मात्र काही वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडतात. त्यामुळे अपघात घडतात. दरवर्षी होणाऱ्या असंख्य अपघातात हजारो लोक जखमी होतात तर काही मृत्युमुखीही पडतात. नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांमार्फत दंडाची तरतूद केली आहे. गेल्या वर्षात वाहतूक पोलिसांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखेकडून विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट गाडी चालवताना, मोबाईलवर संभाषण, मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक, रेड सिग्नल जंपिग, विनाविमा, विनापरवाना, फॅन्सी नंबर प्लेल्ट, धोकादायकपणे वाहन चालवणे, नो-पार्किंग, चुकीचे पार्किंग, डार्क ग्लास, रहदारीला अडथळा, नो-एंट्री, ट्रीपल सीट, क्लॅडस्टाइन ऑपरेशन, दारू पिऊन गाडी चालवणे आदी गुन्हा करणाऱ्या ५५ हजार ३०९ चालकांना दंड केला आहे. येथून पुढे कारवाईची मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे वाहतूक पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular