27.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriकोकणात प्लास्टिक, कचऱ्याने खाड्या धोक्यात

कोकणात प्लास्टिक, कचऱ्याने खाड्या धोक्यात

कोकण किनाऱ्यावर गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यांपेक्षा जास्त प्लास्टिक प्रदूषण आहे.

प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खाऊचे रॅपर्स, घरगुती कचरा आणि अनेक प्रकारच्या घातक कचऱ्यामुळे खाड्या धोक्यात आल्या आहेत. कर्ला येथून चिंचखरीपर्यंतच्या काजळी नदीच्या विस्तीर्ण खाडीपात्रात प्रचंड कचरा पाहायला मिळत असून, प्लास्टिकमुक्तीच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. अनेकजण कचरा रस्त्यावरच फेकत आहेत. खाद्यपदार्थांचे प्लास्टिक कागद खाडीत वाहून जात आहेत. वहाळ, नदी, खाडी, गटारे या सर्वांतील पाणी व त्यातील कचरा अंतिमतः समुद्रातच जात असल्यामुळे गांभीर्याने कचरामुक्त नदी व खाड्या अशी मोहीम आखण्याची गरज आहे. नुकताच आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनच्या सागर महोत्सवाअंतर्गत अनेक अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली. शेवटच्या दिवशी चिंचखरीपर्यंत कांदळवन सफरीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी खाडीतून जाताना प्रचंड कचरा साचल्याचे निदर्शनास आले. कर्ला येथील जेट्टीवरही प्लास्टिकचा प्रचंड कचरा होता. तेथे मोकाट गुरे, कुत्रे कचऱ्यातून अन्न शोधत होते.

अशा प्रकारचे चित्र जागोजागी पाहायला मिळते; परंतु नागरिक, ग्रामस्थ, सुशिक्षित लोक, विद्यार्थ्यांच्या हे ध्यानात कधी येणार ? हा खरा प्रश्न आहे. प्लास्टिक प्रदूषणाने आता परिसीमा गाठली आहे. कारण, माशांच्या पोटातही आता प्लास्टिक आढळू लागले आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या, रॅपर्स एकत्रित करून त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करणे हा पर्याय राहतो. हे प्लास्टिक इतस्ततः कुठेही टाकले की, ते पसरू लागते व प्रदूषण सुरू होते. समुद्र स्वतःकडे काही ठेवत नाही. त्यामुळे भरती-ओहोटीवेळी समुद्राच्या पाण्यातील नको असलेल्या वस्तू किनाऱ्यावर येतात. रासायनिक प्रदूषके, तेल गळती, घरगुती सांडपाणी व मैलापाणी आणि इतर अनेक प्रकारच्या पदार्थांचे तरंगणारे गोळे, सिगारेटची थोटकं, प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तू यांचं प्रमाण सगळीकडेच वाढताना दिसत आहे. दवाखाने आणि रुग्णालये यातून समुद्रात सोडली जाणारी त्याज्ञ्ज औषधं आणि इतर वैद्यकीय प्लास्टिक वस्तूंचा कचराही मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यांचे प्रदूषण वाढवतो.

बेशिस्त पर्यटकांचा फटका – अनेकदा कोकणचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी, मनमुरादपणे फिरण्यासाठी पर्यटक येतात. कोकणातील प्रसिद्ध अलिबाग, नागाव, काशिद, मुरूड, हरिहरेश्वर, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, तारकलीं, देवबाग आणि रेडी या किनाऱ्यांवर प्लास्टिकचा कचरा पर्यटकांकडूनही होत असतो. भरती येते तेव्हा हे सगळं प्लास्टिक किनाऱ्यावरच्या प्रदेशांत पसरते. कालांतराने प्लास्टिकचे कण वाळूत मिसळून जातात आणि त्यांचं विघटन खूप कमी वेगाने होत असल्यामुळे पुळणींवरच अडकून राहतात.

‘एनआयओ’चा निष्कर्ष – कोकण किनाऱ्यावर गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यांपेक्षा जास्त प्लास्टिक प्रदूषण आहे आणि इथले किनारे सूक्ष्म आणि मध्यम आकाराच्या प्लास्टिकच्या कणांमुळे प्रदूषित झाल्याचा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने २०२० मध्ये मांडला होता. मुंबईच्या किनाऱ्यावर हे प्रमाण लक्षणीय आहे. नदीमुखं आणि खाड्या हे किनाऱ्यावरचे प्रदेश प्रदूषणामुळे जास्त बाधित आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular