25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtraप्रवीण दरेकर गुन्हा प्रकरणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

प्रवीण दरेकर गुन्हा प्रकरणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे,  नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खोचक सल्ला दिला.

सहकारी बँकेतील घोटाळय़ाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱया दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. विधिमंडळाच्या आवारात नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा अनेक विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, मुंबई बँकेची लूट करण्यात आली.

लेखापरीक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार असून त्यानुसारच सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते ‘तेव्हा करेल तो भरेल’ असे म्हणणारे भाजपचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत असल्याचे नाना पटोले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे,  नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खोचक सल्ला दिला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपालांवरही टीका केली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवाल पटोले यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular