29.6 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraअंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची दिग्गज नेत्यांची मागणी

अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची दिग्गज नेत्यांची मागणी

रमेश लटके यांचे राजकीय योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे योग्य राहील व यातून एक चांगला संदेश जनतेपर्यंत पोहचेल.

अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करावी यासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आता ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असे पवार यांचे म्हणणे आहे. त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचे समर्थन केले आहे.

शरद पवार यांनी ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ विशेष पत्रकार परिषद घेतली. पवार म्हणाले,  ही निवडणूक फक्त दीड वर्षासाठी आहे, वर्ष दीड वर्षासाठी ही निवडणूक टाळता आली तर बरं होईल. रमेश लटके यांचे राजकीय योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध होणे योग्य राहील व यातून एक चांगला संदेश जनतेपर्यंत पोहचेल.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटीनिवडणूकी वरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच कालपर्यंत भाजपच्या बाजूने री ओढणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अचानक अंधेरीची पोटनिवडणुक भाजपने लढवू नये, असं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उ़़डाली आहे.

राज ठाकरेंच्या पत्रानंतर अनेक भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. यामध्ये भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी, आमचं ठरलय असं म्हणत अंधेरी पूर्वची पोट निवडणूक भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांना राज ठाकरेंच्या पत्राबाबत विचारले असता, लोकशाहीत पत्र लिहिण्याचा, मत मांडण्याचा व व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आमचा उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. तेथील जनता निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे.

RELATED ARTICLES

Most Popular