हजारो कोटींच्या कर्जामध्ये पुरत्या बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची मालकी अखेर टाटा सन्सनेच मिळविली. आज याबाबतची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली. टाटा समूहामार्फत एअर इंडियासाठी तब्बल १८ हजार कोटींची बोली लावण्यात आली होती.
टाटा एअरलाइन्सची स्थापना जे.आर.डी. टाटा यांनी १९३२ साली केली होती. पण १९५३ मध्ये तिचे राष्ट्रीयीकरण झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत या महाराजाची अवस्था अतिशय वाईट झाली होती. एअर इंडियावर तब्बल ३८३६६.३९ कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. रतन टाटांनी पुढे म्हटलं की, जेआरडी टाटांनी स्थापन केलेली ही विमान कंपनी एकेकाळी जगातल्या प्रतिष्ठीत विमान कंपन्यांपैकी एक होती. आताही तीच प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचा टाटा समूह प्रयत्नशील असणार आहे.
२०१७ मध्ये अखेर केंद्र सरकारने एअर इंडियाच्या खासगीकरणाला मंजुरी दिली होती. सरकारने २०१८ मध्ये एअर इंडिया विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल ठरला. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये सरकारने पुन्हा निर्गुंतवणूक प्रक्रियेला सुरूवात केली.
अनेकांनी ही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. त्यात टाटा समुहाने एअर इंडियासाठी सुमारे १८ हजार कोटींची बोली अव्वल ठरली. त्यामुळे तब्बल ६८ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालकी टाटा समूहाकडे एअर इंडियाची सोपवण्यात आली आहे.
कर्जामध्ये बुडालेल्या एअर इंडियाच्या खाजगीकरणा बाबत अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आता टाटा सन्सकडे एअर इंडियाची मालकी जाहीर झाल्यानंतर फुलस्टोप लागला आहे. एअर इंडियाच्या ताब्यात एकूण १२७ विमाने असून, ४२ विमाने आंतरराष्ट्रीय सेवा देण्यासाठी कार्यान्वित आहेत.
टाटा समूहाने १८ हजार कोटींना एअर इंडियाची खरेदी केली आहे. त्यापैकी १५ टक्के रक्कम केंद्र सरकारला, तर उर्वरित रक्कम कर्जफेडीसाठी वापरली जाणार असल्याचे सांगण्यात आले. टाटांनी ट्वीट करून आपला आनंद द्विगुणीत केला आहे. वेलकम बॅक, एअर इंडिया अशी भावनिक ट्वीट केले आहे.
Welcome back, Air India 🛬🏠 pic.twitter.com/euIREDIzkV
— Ratan N. Tata (@RNTata2000) October 8, 2021