गेली दोन वर्ष अख्ख जग कोरोना महामारीच्या संकटामुळे हतबल झाले होते. परंतु भारतामध्ये निर्माण करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधित लसीमुळे या संकटाचा प्रभाव कमी झाला. त्यामुळे सध्याच्या घडीला देशात, राज्यात, जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्याकडे भर देण्यात येत आहे. पहिला डोस ज्यांचा झाला आहे त्यांनी दुसर्या डोसाच्या बाबतीत मात्र टंगळमंगळ करताना दिसून आले आहेत. त्यामुळे स्पष्ट यादी तयार करून अशा लोकांचा शोध घेऊन लसीकरण पूर्ण करताना आरोग्य कर्मचारी दिसत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु असून आतापर्यंत १० लाख ५१ हजार ३८६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ८ लाख ४९ हजार ९४१ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे लहान वयोगटासाठी असणाऱ्या १५ ते १७ वयोगटात आतापर्यंत १४ हजार ७२३ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या ५ हजार ७५६ इतकी आहे.
कोरोना लसीकरण तीन गटांमध्ये सुरु आहे. १८ वर्षांवरील वयोगटाबरोबरच आता १५ ते १७ वयोगटातील मुलांच्याही लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर ६० वर्षांवरील सह व्याधी असणाऱ्या नागरीक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण १७.१८% इतके आहे. तर दुसरा डोस दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ७८.५६ टक्के इतके आहे. १५ ते १७ वयोगटात पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ६६.८८ टक्के आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण २०.५२ टक्के आहे. बूस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण १६.७२ टक्के इतके आहे.