27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriरत्नागिरी पालिकेची कारवाई, अनधिकृत बांधकामाबद्दल ११ जणांना नोटिसा

रत्नागिरी पालिकेची कारवाई, अनधिकृत बांधकामाबद्दल ११ जणांना नोटिसा

नोटिशींना १५ दिवस होऊन गेले तरी कोणत्याही दुकानदाराने आपले बांधकाम स्वतःहून काढलेले नाही

शहरातील चर्मालय ते कोकणनगर पर्यंतच्या रस्त्यामध्ये येणारी अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या नोटिसा पालिकेच्या मालमत्ता विभागाने बजावल्या आहेत. हा रस्ता शंभर फुटी करण्यात येणार असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ११ जणांचा समावेश आहे. त्यासाठी २० दिवसांची मुदत देऊनही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नोटिसीला दाद दिलेली नाही. कोकणनगर येथील रस्त्याच्या बाजूला अनेक अनधिकृत शेड आणि बांधकामे आहेत. यामध्ये व्यवसाय केले जात असून, या अनधिकृत दुकानांबाबत येथील रहिवाशांकडून पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीनंतर ऑगस्ट महिन्यात पालिकने या सर्व अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा काढल्या.

रत्नागिरी शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेमधील रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या मालकीची ही जागा असल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. पालिकेच्या या जागेत अनेक शेड, खोके उभारून तेथे दुकाने चालवली जात आहेत. महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ अन्वये ही नोटीस मिळाल्यापासून तत्काळ ही अतिक्रमणे काढून घ्यावीत; अन्यथा ती पालिकेकडून हटवली जाऊन त्याचा खर्च वसूल करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. नोटिशींना १५ दिवस होऊन गेले तरी कोणत्याही दुकानदाराने आपले बांधकाम स्वतःहून काढलेले नाही. कोकणनगरकडून शहराकडे येणारा मार्ग विमानतळाकडे जातो, म्हणून पालिकेने अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याबाबत नोटिसा दिल्या तरी बांधकामे हटवलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES

Most Popular