29.8 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiriजिल्ह्यातील वाढत्या आत्महत्या, चिंतेचे कारण

जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्या, चिंतेचे कारण

कारणे विविध प्रकारची असली तरी टोकाचे पाऊल उचलण्याकडे तरुणाईचा कल जास्त दिसून आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून, जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या हत्या, खून, लूट, आत्महत्यांच प्रमाण वाढलेले आहे. कारणे विविध प्रकारची असली तरी टोकाचे पाऊल उचलण्याकडे तरुणाईचा कल जास्त दिसून आला आहे. अशा प्रकारच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे पोलिसांनीही चिंता व्यक्त केली आहे. तरुणाई तर अतिशय क्षुल्लक कारणातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात २३ जणांनी आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनांमधील बहुतांशी आत्महत्यांचे कारण आजही गुलदस्त्यातच आहेत.

नैराश्य, हट्ट, कौटुंबिक वाद, मानसिक स्वास्थ्य बिघडलेले, बेरोजगारी यामुळे अनेक जण आत्महत्येचे पाऊल उचलले जाते. नैराश्य, अपयश आणि संकटाचा सामना करता न आल्याने अनेक जण जीवन संपवण्याचा विचार केला जातो. ऑक्टोबर महिन्यात लागोपाठच्या दिवसांमध्ये एकूण ८ जणांनी आत्महत्या केल्या. या सर्व घटना केवळ रत्नागिरी तालुक्यातीलच आहेत. त्यामुळे वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे.

घरातील वातावरण आनंदी आणि मैत्रीपूर्ण असणे गरजेचे आहे. एकमेकांमधील संवाद हरवल्याने तरुण नैराश्येच्या गर्तेत अडकत चालले आहेत आणि त्यातून जीव गमवण्याच्या घटना समोर येत आहेत. घरातील पालकांनी युवक, तरुणांशी संवाद ठेवला पाहिजे. त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजेत तरच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असे मानसोपचार तज्ञांचे मत आहे.

आता पर्यंतच्या घटनांमध्ये घरात गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. १७ जणांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्या आहेत तर तिघांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नाटे येथील एका पोलिसाचा समावेश आहे तर मुलीला पती रागावले म्हणून रत्नागिरी, लांजातील दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येची ही कारणे समजल्यावर पोलीस देखील चिंतातूर झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular