रत्नागिरी शहरामध्ये रस्त्यांची दयनीय स्थिती झाल्यामुळे आणि नगरपरिषदेने वारंवार सांगून देखील अनेक कारणे पुढे करून, खड्डे न बुजवल्यामुळे अखेर आज सकाळी भाजप जिल्हाध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन आणि भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन व शहराध्यक्ष सचिन करमरकर, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन यांच्या नेतृत्वाखाली खड्डे भरण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडणाऱ्या मुसळधार पावसातून देखील शहरातील अनेक ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. त्यामुळे अनेक त्रस्त वाहनचालकांनी भाजपचे आभार मानले.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे खड्ड्यांमध्ये वाहनांचे आणि मनुष्याचे शारीरिक सुद्धा प्रचंड प्रमाणात होणारे नुकसान आता तरी थांबेल, अशा दिलासाजनक प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी व्यक्त केली. भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन, खड्डे बुजवण्याचे काम तडीस नेले. त्या वेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे, महिला मोर्चा सरचिटणीस शिल्पा मराठे, नगरसेविका प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ या उपस्थित होत्या.
खड्यामध्ये असलेल्या रत्नागिरीची डागडुजी करण्यास जिल्हा शासन असमर्थ असल्याने, मारुती मंदिरला हॉटेल मिथीलापासून ते शहरामध्ये आठवडा बाजार इत्यादी ठिकाणचे खड्डे डबर आणि माती टाकून बुजविण्यात आले. रत्नागिरीच्या मनमानी जिल्हा कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांना हातभार लावून खड्डे भरण्यास सहकार्य केले. लोकांच्या मनामध्ये नगरपरिषदेच्या सत्ताधिकाऱ्यां बद्दल नाराजीच आहे. त्यामुळे आता खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान, कंबरदुखीने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे भाजपने विशेष पुढाकार घेत खड्डे बुजवल्याने जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.