24.1 C
Ratnagiri
Monday, January 12, 2026

खेड मतदार संघाची होणार लवकरच पुनर्रचना शिवसेना नेते रामदास कदम

२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा पुनर्रचीत...

रत्नागिरी शहरात क्रांतीनगर येथे कचरा डेपोत सापडले नवजात जिवंत अर्भक

रत्नागिरी शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला...

रत्नागिरीत जाकादेवी परिसरात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे एका विहिरीत...
HomeRajapurराजापूरमधील पुराचा धोका दूर करणार - आमदार किरण सामंत

राजापूरमधील पुराचा धोका दूर करणार – आमदार किरण सामंत

अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा यावर्षी करण्यात येत आहे.

राजापूर शहरावरील पुराची टांगती तलवार कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. भविष्यामध्ये गाळ उपशासाठी आवश्यक लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून आणताना या दोन्ही नद्या गाळमुक्त करत राजापूर शहर पूरमुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले. गाळ उपशाच्या कामाचा आज आमदार सामंत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सातत्याने येणऱ्या पुरामुळे राजापूरवासीयांची डोकेदुखी ठरलेला अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा यावर्षी करण्यात येत आहे. या कामासाठी शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक सन २०२४-२५ च्या अंतर्गत ६४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सुमारे ६४ लाखांच्या मंजूर निधीपैकी जवाहर चौक कोदवली नदीपात्र ते पुढे गणेशविसर्जन घाटापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी २४ लाख ८२ हजार ४६ रुपये, तर अर्जुना नदीपात्रात कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगणापर्यंत गाळ उपसा करण्यासाठी ३८ लाख ७४ हजार ८११ रुपये इतका निधी मंजूर आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने हा गाळ उपसा केला जाणार आहे. याप्रसंगी राजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, जलसंपदा विभागाचे अभियंता रोहित पाटील, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदींसह महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

आवश्यक निधी आणणार – राजापूर शहरावर दरवर्षी पुराची टांगती तलवार असते. ती दूर करण्यासाठी गाळ उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मंजूर करून आणण्यात येईल. त्याआधारे अर्जुना- कोदवलीतील गाळ उपसा वेळीच केला जाईल, असे किरण सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular