31 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraमुख्यमंत्री ठाकरेंशी सकारात्मक चर्चेनंतर, मार्डचा संप मागे

मुख्यमंत्री ठाकरेंशी सकारात्मक चर्चेनंतर, मार्डचा संप मागे

मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी वर्षा येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

कोरोना काळामध्ये निवासी डॉक्टरांनी केलेली कामगिरी अवर्णनीय आहे, त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे विशेष करून या काळातील योगदान विसरता येण शक्य नाही. त्यांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा काढला जाईल. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सैनिक, संचालक, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

मार्डने पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करणे, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे या मागण्यासंदर्भात संप पुकारला होता. शैक्षणिक शुल्क माफी तसेच स्टायपेंडमधून जीएसटी कपात संदर्भात मुख्यमंत्र्यांनी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन, त्यावर अभ्यास करून योग्य तोडगा काढण्यासाठी त्वरित पाऊले उचलण्यास सांगितले.

मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी वर्षा येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चर्चा होऊन मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तोडगा काढण्यात येईल असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा केल्याबद्धल मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

त्याचप्रमाणे कोरोना काळात शासकीय तसेच पालिकेतील निवासी डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीबद्दल योग्य ती दखल घेऊन त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल ते निश्चित करण्याचेही निर्देश दिले. यावेळी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि दिल्याल्या साकारात्मक समाधान व्यक्त केले व राज्य शासन योग्य दिशेने पाऊले उचलेल असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular