शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पराभवाचं खापर अपक्ष आमदारांवर फोडलं होतं. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीत दणकून पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पराभवाचं सर्व खापर अपक्ष आमदारांवर फोडलं आहे.
अपक्ष आमदारांनी आम्हाला मतं दिली नसल्याने आमचा पराभव झाला, असा थेट आरोप राऊतांनी केला होता. यावेळी त्यांनी काही अपक्ष आमदारांची नावं देखील घेतली होती. यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचं नाव होतं.
देवेंद्र भुयार यांनी सांगितले कि, मुख्यमंत्र्यांना अनेकदा विकासकामांच्या निधीसाठी भेट घ्यायची असल्यास ते वेळ देत नाहीत. मतदारसंघातील कामं करण्यासाठी निधी लागतो. मात्र मुख्यमंत्री भेटायलाच वेळ देत नसल्याने कामं मार्गी लागत नाहीत. आम्हाला केवळ एकच आधार असून, तो म्हणजे मंत्रालयाचा सहावा मजला, उपमुख्यमंत्री अजित पवार! अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, ही गोष्ट मी संजय राऊत यांनाही बोलून दाखवली होती. त्यांनी देखील ही बाब मान्य केली आहे.
तसेच संजय राऊत यांच्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान केल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी ते आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे म्हटल्यावर आता संजय राऊतांनी आपल्या आरोपावरून पलटी मारल्याच दिसून आलं आहे.
संबंधित आरोपांबाबत बोलताना राऊत यांनी म्हटलं की, देवेंद्र भुयार मला भेटले. मी त्यांची भूमिका ऐकली, त्याचं म्हणणं ऐकलं. ते प्रामाणिकपणे बोलत होते, एवढंच मला वाटलं. त्यांच्या ज्या भावना आहेत, ते मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. त्यांच्याशी बोलताना वाटलं की ते सत्य बोलत आहेत,” असे राऊत यांनी सांगितले.