सिंधुदुर्ग जिल्ह्यात २००६ मध्ये झालेल्या धान्य घोटाळ्याच्या आरोपातून रेशन दुकानदार अनिल सीताराम खोचरे यांच्यासह ३१ संशयितांची मुख्य न्याय दंडाधिकारी ए. एस. फडतरे यांनी निर्दोष मुक्तता केली. रोजगार हमी योजनेतील काम करणाऱ्या मजुरांना मिळणारे धान्य अपहार केल्याचे व जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याचे दोषारोपपत्र सिंधुदुर्ग पोलिसांनी संशयितांवर ठेवले होते.
दरम्यान, ३७३ क्विंटल तांदूळ व १७.५० क्विंटल गहू, असा ३ लाख ३९ हजार ७४७ रुपये रकमेचा अपहार केल्याचा पोलिसांचा आरोप होता. या खटल्याची सुनावणी या न्यायालयासमोर झाली. न्यायालयाने या सर्वांना निर्दोष मुक्त केले. संशयितांतर्फे अॅड. अजित भणगे, संग्राम देसाई, राजीव बिले, सुहास सावंत, मिहीर भणगे, सपना सामंत, सुनील मालवणकर, अविनाश परब, अशपाक शेख, संजय खानोलकर, श्रुती बिले या वकिलांनी काम पाहिले. यामध्ये अनिल खोचरे यांच्यासह जिल्ह्यातील धान्य दुकानदार, वाहनचालक यांचा समावेश होता.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेतील गहू व तांदळाचा अपहार केल्याचा व जीवनावश्यक वस्तू कायदा कलमांचा उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी यांच्यावर दाखल केला होता. त्यानुसार संशयितांवर दोषारोपपत्र ठेवले होते. या खटल्याची सुनावणी या न्यायालयासमोर झाली. यात ३१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निवाडा देण्यात आला.
अनिल खोचरे यांच्यासह जिल्ह्यातील धान्य दुकानदार, वाहनचालक यांचा समावेश होता. यात नवीन अशोक बांदेकर, प्रशांत श्रीधर सडवेलकर, खादर गौडा बिराजदार, उदय गोपाळ म्हापसेकर, चंद्रकांत केशव वायंगणकर, एकनाथ दत्ताराम भिसे, एकनाथ सत्यवान पावसकर, विष्णू श्रीधर परब, मनोज मोहन मुसळे, , अनिल वासुदेव तवटे, संजय दिगंबर भोकटे, गिरीश अंकुश नेरुरकर, रवींद्र अंकुश नेरुरकर, अनुप्रिती अनिल खोचरे, गोविंद तुकाराम तवटे, संजय गुंडू मेस्त्री, उमेश शिवराम धुरी, प्रभाकर नीळकंठ कदम, श्रद्धा संतोष मेस्त्री, मनोहर वासुदेव ठोंबरे, दिगंबर काशिराम कुबल, मुकुंद राघो धुरी, महेश मधुकर गावडे, पंढरी सीताराम परब अशा ३१ जणांची या खटल्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.