अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड चोदाट शक्यता असून कदाचित त्यांचा शनिवारी सायंकाळी शपथविधीही होऊ शकतो. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राला त्यांच्या रुपाने पहिल्या शुक्रवारी दिवसभराच्या अनेक घडामोडीनंतर शनिवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड होईल आणि कदाचित सायंकाळी ५ वाजता त्या शपथही घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत छगन भुजबळ यांनी दिली. शुक्रवारी प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास दीड तास या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे अजितदादा पवारांकडे असलेली अर्थ आणि नियोजन, उत्पादन शुल्क व क्रीडा ही महत्वाची खाती राष्ट्रवादीकडेच असावीत अशी मागणी करणारे एक पत्र या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचे वृत्त आहे.
दिवसभर मोठ्या घडामोडी – शुक्रवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अधिक वेगाने हालचाली सुरु झाल्या. पक्षातील सर्वच नेत्यांचे मत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद भुषवावे असे असल्याचे लक्षात येताच सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्या बारामतीला होत्या. अंत्यविधीनंतरचे काही धार्मिक विधी शुक्रवारी पार पडले. त्याम ळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. मात्र एका मध्यस्थामार्फत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना उपमुख्यमंत्री होण्याची गळ घालण्यात आली. सायंकाळी उशीरा हाती आलेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
आज बैठक – दरम्यान ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी राष्ट्रवादीच्या सर्व विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्ष नेते पदी अधिकृतपणे निवड होईल. त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि सारेकाही सुरळीतपणे पार पडले तर शनिवारी सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे संकेत ना. छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
प्रफुल्ल पटेल अध्यक्ष ? – दरम्यान अजित पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष प्रफ ल्ल पटेल यांची निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी *देखील सुनेत्रा पवार यांनाच निवडावे असा पक्षातील अनेक नेत्यांचा आग्रह आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांना नेमावे आणि रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांची निवड करावी अशी भुमिका राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी घेतली असून या पार्श्वभुमीवर प्रमुख नेत्यांची मुंबईत गुरूवारी रात्री उशीरा एक बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून प्रफुल्ल पटेल यांनी संवाद साधला.
वर्षावर भेट – गुरूवारी रात्री उशीरा दूरध्वनीवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुम ारास राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जावून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास तास दीड तास चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेले उपमुख्यमंत्रीपद आणि दादांकडे असणारी अर्थ व नियोजन, उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही तीनही खाती राष्ट्रवादीकडेच ठेवावीत याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर हा निर्णय घेण्याचे उभयपक्षी ठरल्याचे वृत्त आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे हे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांना भेटले.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवारांकडे जी जागा होती, त्या जागेबद्दल निर्णय करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगितले की, येत्या काही दिवसात, लवकरात लवकर आम्हाला निर्णय करायचा आहे. त्याच्यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनाही बोलावून त्यांच्याशी चर्चा करून, योग्य निर्णय, जनभावनेचा आदर करून अजित पवारांच्या योगदानाचा विचार करून आम्हाला निर्णय करायचा आहे.
नावाची चर्चा नाही – दरम्यान सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणार का? तशी चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता प्रफुल्ल पटेल म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्या नावाची आम्ही कुठलीही चर्चा मुख्यमंत्र्यासोबत केली नाही. पण, तो आमचा अंतर्गत विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाला त्या जागेवर बसवायचे, हा पक्षाचा निर्णय आहे. जनभावना, आमदारांची भावना आणि माझी स्वतः चीही भावना आहे. मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतोय, कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असे नाही. माझी स्वतःचीही भावना आहे की, योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे. त्या दिशेने आम्ही विचार करू. पण, अजूनही असा विषय आलेला नाही. निर्णय झाल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलू,
सुनेत्रावहिनींशी बोलणार – पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, दोन दिवस झाले आहेत. अजूनही धक्यातून कोणी सावरलेले नाही. राज्यातही दुखवटा आहे. आज तिसरा दिवस आहे. तिथे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.. आम्हाला सुनेत्रा वहिनींशी बोलावं लागेल. पार्थ पवार आहेत. जय पवार आहेत. त्यांच्याशी बोलावं लागेल. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत, पण आजचा दिवस किमान त्यांच्या घरचे कार्यक्रम आटोपून, शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. मी परत परत सांगतोय की आमची जी भावना आहे. जनतेची जी भावना आहे. त्याच्या अनुरुपच निर्णय होणार आहे, असे सांगत पटेल यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचेच संकेत दिल्याची चर्चा होत आहे.
छगन भुजबळांनी काय सांगितले ? – दरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ना. छगन भुजबळ यांनी सांगितले की अजित पवार गटाच्या विधिमंडळ सदस्यांची शनिवारी महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता ठरविला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होवू शकते. उद्या लगेच शपथविधीही होवू शकतो असे छगन भुजबळ प्रसारम ाध्यमांशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भूमिका – दरम्यान शुक्रवारी सायंकाळी उशीरा पत्रकारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत का? असा थेट सवाल त्यांना विचारला. तेव्हा तो पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय असेल. त्यांचे नेते आज मला भेटले. त्यांनी त्यांच्या पक्षाची कार्यपध्दती सांगितली आणि त्यानुसार निवड होईल. ते ज्यांची निवड करतील त्या व्यक्तीला आमची मान्यता असेल असे उत्तर फडणवीस यांनी दिले. त्यामुळे सुनेत्रा पवार या नव्या उपमुख्यमंत्री असतील यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र अधिकृतपणे घोषणा झालेली नाही.

