27.9 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeChiplunरत्नागिरी, चिपळुणातील ३१ वाड्यांना टँकर

रत्नागिरी, चिपळुणातील ३१ वाड्यांना टँकर

६ धनगरवाड्यांना एका टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच जिल्ह्यात फक्त रत्नागिरीत तालुक्यातील पाच गावांमधील २५ वाड्यांना, तर चिपळूणमधील ६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्याद्वारे १० हजार ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अन्यत्र मंडणगड, राजापूर तालुक्यात टँकरची मागणी झाली असली तरीही टंचाई कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तसेच जलजीवन योजनेंतर्गत कामे सुरू असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. फेब्रुवारी, मार्च महिना उजडला की, पाणीटंचाईची झळ बसू लागते. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यास उशिराने सुरुवात झाली. जिल्ह्यात यावर्षी पहिला टँकर रत्नागिरी तालुक्यात सुरू झाला. गतवर्षी लांजा तालुक्यातून सुरुवात झाली होती. यंदा रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असलेल्या पाच गावांमधील २५ वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. एकूण पाच टँकर धावत असून, १० हजार २६० ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

रत्नागिरी शहराजवळील गावात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे; मात्र चिपळूण तालुक्यातील पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील १४ गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. यातील ६ धनगरवाड्यांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मंडणगडात दोन तर राजापुरात २ गावांनी टँकर मागणी केली आहे. लांजा तालुक्यात अजूनही टँकरची मागणी आलेली नाही. दरम्यान, चालू वर्षी जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून, तब्बल ३५७ गावांतील ७२२ वाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. यासाठी ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांची आवश्यकता आहे. यावर्षी संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड आणि रत्नागिरी या तालुक्यांना सर्वांधिक पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

सहा धनगरवाड्यांना टँकरने पाणी – चिपळूण तालुक्यातील पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या गावांची संख्या वाढून लागली आहे. तालुक्यातील १४ गावांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे. यातील ६ धनगरवाड्यांना एका टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाण्याचे स्त्रोत लवकर आटू लागले. आहेत. परिणामी, पाणीपुरवठा योजना असतानाही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. दरवर्षी तालुक्यातील उंचावर वसलेल्या धनगरवाड्यांना पाणीटंचाईची झळ सर्वाधिक बसते. यावर्षी तालुक्यातील धगनरवाड्यातून टँकर सुरू करण्याची मागणी झाली. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील सावर्डे, कोडंमळा, टेरव, कुडप, अडरे व अनारी गावातील धनगरवाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular