28.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriरत्नागिरीजवळच्या चोरट्यांचा गावांमध्ये रात्री धुमाकूळ, ५ घरे फोडली

रत्नागिरीजवळच्या चोरट्यांचा गावांमध्ये रात्री धुमाकूळ, ५ घरे फोडली

अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लांबवला.

रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील ४ आणि फणसवळे येथील १ अशी एकूण ५ बंद घरे एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी सोमवारी रात्री अक्षरशः धुमाकुळ घातला. या अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लांबवला. या चोऱ्या सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री झाल्या. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, खेडशी येथील विश्वास दत्तात्रय देसाई आणि त्यांच्या घराशेजारी अन्य ३ घरे तसेच फणसवळे येथील भिकाजी माने यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. विश्वास देसाई हे आपल्या कुटुंबासह उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जम्मू-कश्मिरला गेले आहेत. मंगळवारी सकाळी विश्वास देसाई यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे घर फोडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीसांना देसाईंच्या घरासोबतच आजुबाजुची अन्य ३० घरे चोरट्यांनी फोडलेली दिसून आली. दरम्यान, खेडशीनजीकच असलेल्या फणसवळे येथील भिकाजी माने हे कुटुंबासह मुंबईला असतात. त्यांचे बंद घरही अज्ञातांनी फोडल्याचे मंगळवारी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनीही ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी खेडशी आणि फणसवळे येथील घटनास्थळी तातडीने धाव घेत चोरीचा पंचनामा केला. सायंकाळी उशीरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

RELATED ARTICLES

Most Popular