28.4 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriशिक्षक भरतीनंतरही १०६३ पदे रिक्त जिल्हा परिषद…

शिक्षक भरतीनंतरही १०६३ पदे रिक्त जिल्हा परिषद…

२०२३-२४ या वर्षाकरिता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमले होते.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकभरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच ठरणार आहे. मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेने ९९६ शिक्षकांची भरती केली. ही भरती होऊनही जिल्ह्यात अद्याप १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न संपला असला तरी एकशिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात शून्यशिक्षकी शाळा होऊ नये याकरिता रिक्त पदांनुसार शाळांना एक एक शिक्षक देताना शिक्षण विभागाला कसरत करावी लागत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक पदे मोठ्या संख्येने रिक्त झाल्यामुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी शाळा झाल्या होत्या.

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता २०२३-२४ या वर्षाकरिता मानधनावर तात्पुरते शिक्षक नेमले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिक्षकभरती झाली. आचारसंहितेमुळे शिक्षकभरती रखडली होती. मेमध्ये अखेर या शिक्षकभरतीला मुहूर्त मिळाला. समुपदेशनाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची पदे भरण्यात आली. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत ७१४ उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत २३० पदवीधर शिक्षक भरण्यात आले आणि उर्दूचे ५८ शिक्षक भरण्यात आले. जिल्ह्यात ९९६ शिक्षकांची भरती होऊनही १ हजार ६३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती होऊनही शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा शिक्षकांचा गोंधळ ग्रामीण भागात होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेची कमान प्रशासनाकडे आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्यासाठी शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे; अन्यथा पुन्हा पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular