कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसच्या पसंतीचा आलेख दिवसागणिक उंचावत आहे. मात्र उन्हाळी सुट्टीत धावणाऱ्या फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने काही चाकरमान्यांची वेगवान प्रवासाची संधी पुन्हा हुकली आहे. २० मेपर्यंतचे प्रवासी प्रतीक्षा यादीवर आहेत. यामुळे चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडल्याने उन्हाळी सुट्टी हंगाम ात धावणाऱ्या जादा उन्हाळी स्पेशल रेल्वेचा आधार घ्यावा लागणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २२२२९/ २२२३० क्रमांकाच्या सीएसएमटी मुंबई-मडगाव सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेगवान प्रवासाची साऱ्यांनाच भुरळ पडली आहे. मात्र प्रत्येक सणांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीच पडते. शिमगोत्सवातही हीच परिस्थिती कायम राहिल्याने गावी येण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवासाचे नियोजन करणाऱ्या चाकरमान्यांचा आशेवर पाणी फेरले होते. गेल्या मडगाव व मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसमधून तब्बल ५० हजार ७३९ प्रवाशांनी सफर करत नव्या विक्रमाची नोंद केली होती.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या सर्वच फेऱ्यांना मिळत असलेल्या भरभरून प्रतिसादामुळेच एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी, असा आग्रह देखील रेल्वे प्रवासी संघटनांसह कोकण विकास समिती, अखंड कोकण प्रवाशी सेवा संघटनांकडून रेल्वे बोर्डासह केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आला आहे, मात्र अद्यापही सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदे भारत एक्स्प्रेस मंगळूरपर्यंत चालवण्याचा घाट सुरू आहे. याला महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांनी ठाम विरोध दर्शवला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांच्या फुल्ल झालेल्या आरक्षणामुळे चाकरमान्यांना मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्यांचाच पर्याय उरला आहे. उन्हाळी स्पेशल गाड्यांचे २४ मार्चपासून आरक्षण खुले होताच यातील फेऱ्यांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीवरील तिकिटे पडली आहेत.
यामुळे चाकरमान्यांच्या नजरा आता जादा उन्हाळी स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासन जादा उन्हाळी स्पेशल गाड्या सोडून चाकरमान्यांना दिलासा देते की, रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून बोळवण करते, हाच औत्सुक्याचा विषय बनला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांची लोकप्रियता पाहता या गाडीला २० डब्यांचा रेक देण्याची आवश्यकता आहे. मुंबई-मडगाव आणि मंगळूर-महगाई वंदे भारत एक्सप्रेस एकत्रिकरणाला महाराष्ट्रातील सर्वच प्रवासी संघटना विरोध करत आहेत. मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी मिळत नसतील, तर त्याचा फटका महाराष्ट्र आणि गोव्याच्या सेवेला बसता कामा नये: मंगळूर-मुंबई स्वतंत्र वंदे मारत एक्सप्रेस सुरू करून तिला आताच्या वंदे भारतला नसलेले सावंतवाडी, वैभववाडी, चिपळूण, माणगाव, कुडाळ हे थांबे देण्यात यावेत, असे रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी म्हटले आहे.