26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 18, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeIndiaज्ञानवापी मशिद परिसर हिंदू देवतांच्या पूजा प्रकरणी, पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी

ज्ञानवापी मशिद परिसर हिंदू देवतांच्या पूजा प्रकरणी, पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी

पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात उपस्थित हिंदू देवतांची पूजा करण्याची परवानगी मागितली होती.

वाराणसीच्या ज्ञानवापी श्रृंगार गौरी वादावर पुढील सुनावणी सुरू राहणार आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण सुनावणीस योग्य आहे. मुस्लीम पक्षाने या खटल्याची सुनावणी न केल्याबद्दल दाखल केलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावले. हे प्रकरण १९९१ च्या उपासना कायद्यांतर्गत येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. आता वाराणसी जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयादरम्यान हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन आणि विष्णू शंकर जैन न्यायालयात उपस्थित होते. मात्र, मुख्य याचिकाकर्त्या राखी सिंग हजर नव्हत्या. न्यायाधीशांनी एकूण ६२ लोकांना कोर्टरूममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. २४ ऑगस्ट रोजी या प्रकरणातील हिंदू आणि मुस्लिम बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. यानंतर वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी १२ सप्टेंबर म्हणजेच आजपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.

पाच हिंदू महिलांनी ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात उपस्थित हिंदू देवतांची पूजा करण्याची परवानगी मागितली होती. या महिलांनी विशेषतः दररोज शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाच्या आदेशावरून मशिदीचे सर्वेक्षणही करण्यात आले. सर्वेक्षणानंतर हिंदू बाजूने मशिदीच्या तळघरात शिवलिंग असल्याचा दावा केला, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगितले होते.

वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात बांधलेल्या ज्ञानवापी मशिदीबाबत सुरू असलेला वाद वर्षानुवर्षे जुना आहे. २१३ वर्षांपूर्वी या मंदिर-मशिदींबाबत दंगली झाल्या आहेत. मात्र, स्वातंत्र्यानंतर या मुद्द्यावरून दंगल झाली नाही. अयोध्येत राम मंदिराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर १९९१ मध्ये ज्ञानवापी हटवण्यासाठी आणि तिची जमीन काशी विश्वनाथ मंदिराला देण्यासाठी दाखल करण्यात आलेली पहिली याचिका दाखल करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

Most Popular