28.4 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

रत्नागिरीत बच्चू कडूंनी घेतला दिव्यांगांचा जनता दरबार

दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती...

४० हजार मीटर फॉल्टी असल्याचा महावितरणचा दावा

महावितरण कंपनीच्या स्मार्ट अर्थात टीओडी (टाईन ऑफ...

कोकणच्या एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंत रेल्वेकडून माहिती

सीएसएमटी रेल्वेस्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईच्या...
HomeRatnagiriगैरप्रकार आढळल्यास केंद्र मान्यता कायमची रद्द, २१ पासून दहावीच्या परीक्षा

गैरप्रकार आढळल्यास केंद्र मान्यता कायमची रद्द, २१ पासून दहावीच्या परीक्षा

परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करावा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) २९ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना भरारी पथके भेट देणार आहेत. ज्या केंद्रांवर गैरप्रकारांची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षेची मान्यता पुढील वर्षांपासून कायमची रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे. जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत, आदी उपस्थित होते. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परिसरातील १ कि.मी.च्या आतमधील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवावीत. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा केंद्र असलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांत, वर्गखोल्यांमध्ये व शालेय आवारात चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत.

परीक्षा केंद्र असलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांत, वर्गखोल्यांमध्ये व शालेय आवारात चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ३० दिवस बॅकअप् राहील याची व्यवस्था करणे किंवा १५ दिवसांनी बॅकअप् काढून घेऊन जतन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षांपासून कायमची रद्द केली जाईल. परीक्षा केंद्रावर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करावा.

१३ परीक्षक कार्यालये – बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यात ३८ परीक्षा केंद्रांवर १६ हजार ५४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीसाठी लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यात दहावीची ७३ परीक्षा केंद्रांवर १८ हजार ३८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील परीक्षा सुरळीत होण्यासाठी १३ परीक्षक कार्यालय आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती सावंत यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular