24.4 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiri'अभियांत्रिकी'साठी २५० कोटी - मंत्री उदय सामंत

‘अभियांत्रिकी’साठी २५० कोटी – मंत्री उदय सामंत

. जिल्हा नियोजन समितीचा ३६० कोटींचा विकास आराखडा मंजूर आहे.

रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी २५० कोटी रुपये मंजूर आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ७५० विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. १५ ऑगस्टला त्याचे उद्घाटन होणार आहे. ‘लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय’ या नावाने हे महाविद्यालय ओळखले जाईल. त्यामुळे कुणबी समाज बांधवांची माग्रणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शीळ जॅकवेलवर नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत, येही त्यांनी स्पष्ट केले. येथील हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, शहरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.

शहराच्या खालच्या भागात होणाऱ्या ८ कोटींच्या जलतरण तलावाची पाहणी केली. १०५ कोटींच्या पोलिस गृहनिर्माण वसाहतीच्या कामाची पाहणी केली. १५ कोटींच्या शासकीय ग्रंथालयाच्या कामाची पाहणी केली. थ्रीडी शोच्या २० कोटींच्या कामाची पाहणी केली. रहाटाघर बसस्थानकाच्या ५ कोटींच्या कामाचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या ५ कोटींच्या कामाची माहिती घेतली. जिल्हा क्रीडासंकुलाच्या २० कोटींच्या कामाचाही आढावा घेतला तसेच प्राणी संग्रहालयाचे कामही जोरात सुरू आहे. मी विकासाबाबत जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. अनेक कामांचा १५ ऑगस्टला लोकार्पण सोहळा होणार आहे.

माजी क्रिकेटपटू प्रवीण आंब्रे यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचे मराठीत प्रकाशन करण्यात येणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या कार्यक्रमाला भारताच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव तसेच विद्यमान कर्णधार रोहित शर्मा येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २० विद्यार्थी अमेरिकेतील नासा संस्थेला भेट देणार आहेत. त्याबाबतचे सर्व प्रशिक्षण मुलांना देण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून नावीन्यपूर्ण हेडअंतर्गत निधी देणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीचा ३६० कोटींचा विकास आराखडा मंजूर आहे; परंतु आचारसंहितेमुळे त्या कामांना काहीसा अडथळा आला होता.

हा निधी नियोजन करून लवकरात लवकर खर्च करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. शीळ धरण येथे जुन्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये काहीतरी तांत्रिक दोष होण्याची भीती आहे. त्यामुळे दक्षता म्हणून दीड लाख मंजूर करून नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.

…तर पटोलेंची चौकशी करा – पुण्यातील हीट अॅण्ड रनप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्या मोटारीत कोण आमदार असल्याची माहिती मिळाली आहे, अशी स्फोटक माहिती दिली आहे. नाना पटोले यांना अशी काही स्फोटक माहिती असल्यास त्यांनी सीपींना ही माहिती द्यावी. पटोले यांचीदेखील या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.

हिंजवडीतील ३७ कंपन्यांनी केले स्थलांतर – हिंजवडी औद्योगिक विकास महामंडळातील ३७ कंपन्या अन्यत्र स्थलांतरित झाल्या आहेत, अशी माहिती आहे. यावर सामंत म्हणाले, “माझ्यापर्यंत अशी कोणतीही माहिती आलेली नाही. या कंपन्या का स्थलांतरित होत आहेत, याची माहिती घेऊन सांगेन; पण हिंजवडीत सर्व पायाभूत सुविधा आहेत.”

RELATED ARTICLES

Most Popular