28.4 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

राज आणि माझ्यातील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला : उद्धव ठाकरे

महायुत्ती सरकारने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणक्रमात पहिलीपासून हिंदी...

बनावट कागदपत्राने वाहने विकणारी टोळी पकडली…

कोल्हापूर टेंबलाईवाडी (ता. करवीर) येथील जुन्या वाहनांची...

चिपळूणात अतिवृष्टीने दरड कोसळली, घरांना धोका

शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला...
HomeRajapurनिसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणण्याचे फडणवीसांना साकडे

निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणण्याचे फडणवीसांना साकडे

कोकणामध्ये रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित करू नयेत.

रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित न करता कोकणाच्या निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणावेत, अशी विनंती रिफायनरीविरोधी संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रचारसभे निमित्ताने राजापूर दौऱ्यावर आले असता बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. प्रचारसभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस नुकतेच राजापूर दौऱ्यावर आले होते.

यावेळी बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, उपाध्यक्ष कमलाकर गुरव, ज्येष्ठ कार्यकर्ते सूर्यकांत सोडये, सत्यजित चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कोकणामध्ये रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित करू नयेत. त्याऐवजी कोकणाच्या निसर्गाला अनुसरून चांगले उद्योग आणावेत, त्याचे स्वागतच करू, असे सांगण्यात आले. तसेच बारसू, पन्हळे, गोवळ येथील दोनशेहून अधिक कातळशिल्पांचे गुगल नकाशावरचे स्थान मॅपवर दाखवून कातळशिल्प रक्षण व संवर्धन याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.

नाटे, आंबोळगड किनारा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने तोही संरक्षित करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी फडणवीस यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना संघटनेसोबत निवडणुकीनंतर बैठक आयोजित करण्याबद्दल सांगितल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular