26.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKokan४८ तास धोक्याचे ! कोकणासह राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

४८ तास धोक्याचे ! कोकणासह राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

३ दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

कोकण उपनगरांमध्ये मागील २४ तासांमध्ये किनारपट्टीसह मुंबई शहर आणि अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळालं. तर, मराठवाडा, विदर्भात मात्र पारा चांगलाच वाढल्याचं लक्षात आलं. अकोल्यामागोमाग म ालेगावातही पारा चाळीशीपार पोहोचला असून, ४३ ते ४४ अंशांदरम्यानच्या तापमानानं नागरिकांची चांगलीच होरपळ केली. पुढील ४८ तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार असून, पुन्हा अवकाळीचे ढग राज्यावर दाटून येताना दिसतील. ज्यामुळं पूर्व विदर्भाला उन्हाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या पूर्व क्षेत्रात पुढचे ३ दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि सोबतच मराठवाड्याच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सलग ३ दिवस उष्णतेचा मारा सहन केल्यानंतर अखेर गुरुवारी पुण्यातील तापमानात घट झाली. पण, ही घट क्षणित असून, पुढचे तीन दिवस मात्र इथं तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होत असली तरी सरासरीपेक्षा मात्र हा आकडा अधिक राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular