26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeEntertainmentआमिर खानने थेट हात जोडत चाहत्यांची माफी मागितली

आमिर खानने थेट हात जोडत चाहत्यांची माफी मागितली

काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं आमिर यात म्हणाला होता.

आमिर खान लाल सिंह चढ्ढा या सिनेमाच्या अपयशाचा मागील काही दिवसांपासून सामना करत आहे. पण आता त्याने थेट हात जोडत चाहत्यांची माफी मागितली आहे. आमिर खानच्या आमिर खान प्रोडक्शन या त्याच्या व्यावसायिक सोशल मीडिया हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्याने ही पोस्ट ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर केली होती. यामध्ये त्याने ‘आपण सर्वजण माणसं आहोत आणि चुका या माणसांकडूनच होतात’, असं म्हटलं आहे.

बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट त्याच्या जुन्या व्हायरल व्हिडियो मुळे आणि लाल सिंघ चढ्ढाच्या अपयशामुळे अनेक दिवस चर्चेत आहे. सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा अपयशी ठरला म्हणून त्यानं माफी मागितली. पण त्यामुळे पुन्हा तो ट्रोल झाला. त्यानंतर आमिरनं तो व्हिडिओ डिलीट केला. पण पुन्हा काही मिनिटांनी पोस्ट केला. यामुळे नेटकरी नेमके काय सुरु आहे आमिरचे म्हणून संतापले होते.

सध्या सप्टेंबर महिन्यातील मच्छामि दुक्कडम हे पर्व सुरू आहे. या काळात आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याविषयी माफी मागितली जाते. याच पर्वाच्या निमित्ताने आमिर खान याने हा व्हिडिओ शेअर केला असल्याचे बोलले जाते आहे. काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा असं आमिर यात म्हणाला होता.

सध्या आमिर खाननं सिनेमातून ब्रेक घेतला आहे. तो सॅन फ्रॅन्सिस्को इथे गेलाय. रस्त्यावर भटकंती करतानाचा त्याचा फोटोही समोर आला आहे. एका स्पॅनिश सिनेमाचा सुट्टीवरून परत आल्यावर आमिर रिमेक करणार असल्याच वृत्त कळतं आहे परंतु, अद्याप त्याबाबतीत अधिकृत काहीही पुढे आलेलं नाही.

RELATED ARTICLES

Most Popular