28.6 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

चिपळुणातील दाम्पत्याने घेतली वाशिष्ठी नदीत उडी

चिपळूण शहरातील गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून एका दापत्याने...

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...
HomeKhedमहामार्गावर वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू

महामार्गावर वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू

रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहने सावकाश चालवावे असे अहवान वनविभागामार्फत केले गेले आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील आवाशीनजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नर जातीच्या सांबराचा मृत्यू झाला. महामार्गावर वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास आल्याने सचिन खोपकर यांनी सकाळी ७.०० वा स्थानिक वन अधिकारी यांना दुरध्वनीव्दारे कळविले. वनविभागाला ही बातमी प्राप्त होताच ७.३० चे दरम्यान घटनास्थळी वनक्षेत्रपाल दापोली श्री. पी. जी. पाटील व त्याचे अधिनस्त कर्मचारी यांनी पाहणी केली. सांबर मृत अवस्थेत दिसून आला. मृत्यू पावलेला सांबर हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ७ ते ८ वर्ष असावे, वाहनाचा जोरदार धक्का बसल्याने सदर सांबर मृत झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.

त्याच्या तोंडाला मार लागून रक्त येत होते. तर पाठीमागील उजव्या पायांवरती खरचटलेल्या खुणा दिसुन आल्या. मृत सांबर ताब्यात घेवुन पशुवैद्यकिय अधिकारी खेड यांजकडून तपासणी करण्यात आली. सदरील घटना ही सकाळी ४ ते ५ वा. च्या सुमारास घडली असावी असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या घटनेबाबत वनक्षेपाल दापोली यांनी अज्ञात वाहन व वाहनचालकाविरूध्द गुन्हा नोंद केला असून पुढील तपास चालू आहे. तपास विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई (अतिरिक्त कार्यभार), व वैभव बोराटे, (सहाय्यक वनसंरक्षक) (अ. का.), रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखाली व पी. जी. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, पुढील तपास करीत आहेत.

वनपाल खेड सुरेश उपरे, वनरक्षक काडवली अशोक ढाकणे, वनरक्षक आंबवली श्रीम. प्रियांका कदम, वनरक्षक तळे परमेश्वर डोईफोडे, वनरक्षक खवटी रानबा बंबर्गेकर उपस्थित होते. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्याकरता वनविभागाचा टोल फ्रि क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल दापोली यांनी केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहने सावकाश चालवावे असे अहवान वनविभागामार्फत केले गेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular