25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriशासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा - पालकमंत्री उदय सामंत

शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री उदय सामंत

गृहोपयोगी वस्तू आणि सुरक्षा संच शासनाकडून मोफत देण्यात येत आहे.

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (जिल्हा रत्नागिरी) यांच्यावतीने रत्नागिरी तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना आज पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम देसाई बँक्वेट येथे झाला. सहायक आयुक्त कामगार संदेश आयरे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, दिलीप सावंत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, माझी लाडकी बहीण, लेक लाडकी यांसारख्या योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर कामगार विभागांच्या २१ योजनांपैकी अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू वाटप ही एक योजना आहे. या माध्यमातून एका नोंदीत कामगारांच्या घरात २० हजार रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू आणि सुरक्षा संच शासनाकडून मोफत देण्यात येत आहे. यातून आपली नक्कीच आर्थिक उन्नती होणार आहे. समाजातील किंमत कष्टावर अवलंबून असते. कष्टाचं मोल व्हावं, तुमच्या घरामध्ये देखील गणपती सणाआधी अपेक्षित आर्थिक लाभ मिळावा. कामगार विभागामार्फत मुलांचे प्राथमिक शिक्षण ते लग्नापर्यंत साठीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुका ठिकाणी दरवर्षी नोंदणी झाली पाहिजे. योजनामधून प्राथमिक शिक्षणासाठी २ हजार ५०० रुपये, ८ ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी ५ हजार रुपये, १० वी नंतरच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये, अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख, नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये मिळतात. त्यामुळे स्वतः नोंदणी करण्यासाठी तसेच इतरांना, शेजाऱ्यांनीही नोंदणीबाबत सांगण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याप्रसंगी संतोष आंबेकर, संभाजी चांदे आदींना गृहोपयोगी वस्तू व सुरक्षा संचचे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

साहाय्यता, विवाहासाठी मदत – महेश अवसरे यांचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्याने महिमा अवसरे यांना ५ लाखांचा धनादेश, सुधीर जाधव या नोंदणीकृत कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने सिध्दांत जाधव यांना २ लाखांचा, संजय शंकर जाधव यांना नोंदणीकृत कामगाराच्या एका मुलीच्या विवाहासाठी ५१ हजारांचा, नोदणीकृत प्रथमेश सुरेश पांचाळ यांना विवाहासाठी ३० हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular