रत्नागिरीतील गणपतीपुळे तीर्थक्षेत्र येते अखेर पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रत्नागिरी मधील कोरोना निर्बंधाचे अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत, त्यामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेले हॉटेल्स, किनाऱ्यालगतची लहान मोठी दुकाने आणि स्थानिक व्यवसाय इत्यादी आता सुरू करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनासोबतच लागोलाग सुट्ट्या आल्यामुळे विकेंडला जोडून सुट्टी आल्यामुळे आणि १५ ऑगस्ट पासून राज्यांमध्ये देण्यात आलेल्या कोरोना निर्बंधावरील शिथिलतेमुळे समुद्रकिनारे, चौपाटी, गार्डन पुन्हा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे विकेंडच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन अनेक जण कोकणामध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथील सुद्धा समुद्रकिनारा फुल झाला आहे. काहीशा प्रमाणात पर्यटकांनी गणपतीपुळेमध्ये वर्णी लावल्याने स्थानिक पर्यटकांसाठी काहीतरी उत्पन्नाचे साधन निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील दीड वर्ष कोरोना महामारीमुळे स्थानिक ग्रामस्थांचे उत्पन्नाचे साधनच बंद झाले होते, त्यामुळे जर व्यवसाय होत नसल्याने जगायचे कसे उदरनिर्वाह कसा करायचा, अशा अनेक आर्थिक प्रश्नानी डोके भंडावून सोडले होते. परंतु शासनाने आता दिलेल्या सवलतीमुळे नक्कीच काही प्रमाणात आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. बाहेरील पर्यटकांना कोकणातील समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्याने, किनार्यावरती जीवरक्षक तैनात करण्यात येत होते. परंतु कोरोना काळामध्ये सर्वच बंद असल्याने त्यांची नेमणूक सुद्धा रद्द करण्यात आलेली. आत्ता शासनाने केलेल्या अनलॉकमुळे गर्दी वाढत असल्याने , आणि पोलीस सुद्धा समुद्रात जाणार्यांना हटकत असल्याने, लवकरात लवकर जीवरक्षक नेमण्याची मागणी नाराज पर्यटकांकडून केली जात आहे.