23.9 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriलग्नाला आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू

लग्नाला आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू

लग्न समारंभ आटोपून अनंत तेरवणकर आज दुपारी कोळंबे येथे धरणात आंघोळीसाठी गेले होते.

रत्नागिरीतील कोळंबे येथे गुरूवारी लग्न होते. या लग्न समारंभासाठी अनंत तेरवणकर व त्यांचे कुटुंबीय गेले होते. लग्न समारंभ आटोपून अनंत तेरवणकर आज दुपारी कोळंबे येथे धरणात आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. या धरणाजवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांनी त्यांना बुडताना पाहिले. महिलांनी गावात येऊन या घटनेची माहिती दिली.

लग्नासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोळंबे ता. रत्नागिरी येथे घडली. अनंत अर्जुन तेरवणकर वय ५२. रा. गोळप, तेरवणकरवाडी, रत्नागिरी असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव असून, ते एका लग्न समारंभारासाठी आले होते. या घटनेनंतर गोळप परिसरात शोककळा पसरली आहे. पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांनी पाण्यात गटांगळ्या खाल्ल्या, परंतु त्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला. लग्न घरामध्ये या दुखद घटनेमुळे शोककळा पसरली.

महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अनंत तेरवणकर यांना पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात नेल्यावर तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु होते. अनंत तेरवणकर हे गोळप येथे एका बागेत कामाला होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी व भाऊ असा मोठा परिवार आहे. पाण्याचा अंदाज चुकल्याने लग्न घरामध्ये अचानक पणे अशा घडलेल्या अघटित गोष्टींमुळे आनंदाचे वातावरण पूर्णपणे बदळून गेले आणि दुखाचे सावट पसरले.

RELATED ARTICLES

Most Popular