28 C
Ratnagiri
Wednesday, June 11, 2025

मुंबईत ट्रेनचा भयावह अपघात, वेगवान लोकलचे प्रवासी धडाधड कोसळले!

मुंबईमध्ये सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास...

भौगोलिक कामांसाठी ३४ कोटींचा खर्च…

कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या...

महायुतीच्या हिताला बाधा पोहचू देणार नाही – सुनील तटकरे

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना...
HomeMaharashtraहेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय अभिमानस्पद

हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय अभिमानस्पद

कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय अलीकडेच घेतला होता. या पुरोगामी निर्णयाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेरवाड पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश बुधवारी एका पत्राद्वारे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले. याशिवाय हेरवाड ग्रामपंचायतीच्या विधवा प्रथा बंदी ठरावाचे रूपांतर शासकीय परिपत्रकात करण्यात आले आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ठराव घेण्याबाबत प्रोत्साहीत करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास विभागाने आज या परिपत्रकाद्वारे केले. आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे यासारख्या अनिष्ठ प्रथांचे पालन केले जाते.

या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि हेरवाडच्या ग्रामसभेने विशेष पुढाकार घेतला. अशा वेळी प्रत्येक महिलेला खऱ्या आधाराची गरज असते. त्यामुळे अनिष्ट प्रथा बाजूला सारून, प्रसार माध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला. आता राज्य सरकारने विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन काम करावे,  असे आवाहन या परिपत्रकामार्फत करण्यात आले आहे.

अजूनही विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असताना विधवा प्रथेचे समाजात पालन केले जाते. अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज होती. या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने ही प्रथा बंद घेण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा विचार केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular