25.9 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRajapurविहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, नैसर्गिक अधिवासात सोडले

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, नैसर्गिक अधिवासात सोडले

बिबट्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी पाच तास ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम सुरू होती.

वन्यप्राणी नैसर्गिक अधिवास सोडून मनुष्यांच्या वाडी वस्तीत यायला लागले आहेत. वाघ आणि बिबट्यांचा खुलेआम वावर अनेक ग्रामीण आणि शहरी भागाच्या ठिकाणी सुद्धा झालेला दिसून येत आहे. अनेक वेळा भुकेसाठी ते वन्यजीव मानवी वस्तीत शिरायला लागले आहेत. भूकेपाई ते मनुष्य आणि पाळीव प्राण्यांवर सुद्धा हल्ले करायला लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागाच्या आसपास जिथे जंगलयुक्त परिसर असेल त्या ठिकाणी, या वन्य पशूंचा वावर वाढला आहे.

राजापूर तालुक्यातील खिणगिणी कदमवाडी येथील ग्रामस्थ प्रभाकर कदम यांच्या विहिरीत बुधवारी  भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटया पडला. याबाबतची माहिती दूरध्वनीवरून मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सागर गोसावी, दीपक म्हादये, विजय म्हादये, प्रथमेश म्हादये यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढत पिंजऱ्यात जेरबंद केले. भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जीवदान दिले.

बिबट्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये जाण्यासाठी पाच तास ग्रामस्थांच्या मदतीने ही मोहीम सुरू होती. त्याला जेरबंद केल्यावर त्याची तपासणी करण्यात आली. सुमारे पाच वर्षे वयाचा मादी जातीचा बिबट्या असून त्याची लांबी १७७ सेमी तर उंची ६१ सेमी इतकी आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. पण वन्यपशूंच्या मानवी वस्तीतील वाढत्या वावरामुळे चिंतेचे आणि सोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular