24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriरत्नागिरीत अद्ययावत कौशल्यवर्धन केंद्र - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीत अद्ययावत कौशल्यवर्धन केंद्र – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला दिशा देणारे मोठे पाऊल आहे.

एमआयडीसी आणि टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेले चंपक मैदानातील कौशल्यवर्धन केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हे अद्ययावत कौशल्यवर्धन केंद्र साकारले जात आहे. एमआयडीसीच्या जागेवर १ एकर जागेत हे अत्याधुनिक केंद्र उभे राहत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १९६ कोटी २८ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी टाटा टेक्नॉलॉजिज लिमिटेडकडून १६५ कोटी आणि एमआयडीसीकडून ३१ कोटी ११ लाख असा निधी उपलब्ध आहे.

केंद्राच्या उभारणीचे काम जलदगतीने सुरू आहे. आवश्यक यंत्रसामुग्रीही दाखल झाली आहे, ज्यामुळे हे केंद्र काही महिन्यांतच सुरू होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सुमारे सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता या केंद्रामध्ये आहे. केंद्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग व्यवसायांना आवश्यक असणारी कौशल्ये शिकवली जातील. अभ्यासक्रमांमध्ये कृत्रिम बुद्धिमंतासारख्या अत्याधुनिक प्रशिक्षणाचाही समावेश असणार आहे. हे केंद्र तंत्रज्ञानाच्या युगातील वाढती कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. हा प्रकल्प केवळ एक प्रशिक्षण केंद्र नसून, रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला दिशा देणारे मोठे पाऊल आहे.

कोकणातील तरुणांसाठी वरदान – उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील तरुणांना त्यांच्या जिल्ह्यातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेऊन नोकरी मिळवण्याची किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी या केंद्रामुळे मिळेल. त्याचबरोबर, स्थानिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळाल्याने त्यांच्या उत्पादकतेत आणि विकासात लक्षणीय वाढ होईल. महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोलीनंतर सुरू होणारे हे केंद्र कोकणातील तरुणांच्या भविष्यासाठी एक वरदान ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular