29.4 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriराऊतांची नोटीस म्हणजे रडीचा डाव - नीलेश राणे

राऊतांची नोटीस म्हणजे रडीचा डाव – नीलेश राणे

निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे रडीचा डाव आहे. २०१९ मध्ये आमचा झालेला पराभव आम्ही स्वीकारला. आम्ही त्यानंतर रडारड करीत बसलो नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. राऊत यांनी कोकणी जनतेची माफी मागायला हवी, असे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केले. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, पैशाने जर तुमचा पराभव झाला असे वाटत असेल तर तुम्ही दहा वर्षात काय काम केले हे जनतेसमोर ठेवायला हवे होते.

तुमच्याच गावात तुम्ही ‘मायनस’ (कमी मताधिक्य) का झालात याचेही उत्तर तुम्ही जनतेला द्यायला हवे. विनायक राऊत यांच्यात पराभव स्वीकारण्याचे धाडस नसल्यानेच ते आता आरोप करीत सुटले आहेत. त्यांचे प्रयत्न आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आहेत. म्हणूनच त्यांनी नारायण राणे यांची खासदारपदी झालेली निवड रद्द करावी, अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेली नोटीस म्हणजे कोकणी जनतेचा अपमान आहे. कोकणातील जनतेने खासदार राणे यांना तब्बल ५० हजार मतांनी निवडून दिले असल्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular