27.1 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeMaharashtraकोरोनाचा धोका वाढतोय; ४ मृत्यू २४ तासांत ८६ नव्या रुग्णांची नोंद

कोरोनाचा धोका वाढतोय; ४ मृत्यू २४ तासांत ८६ नव्या रुग्णांची नोंद

सरकार आणि आरोग्य विभाग लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.

पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी राज्यात कोरोना संसर्गाचे ८६ नवीन रुग्ण आढळले. त्याच वेळी, या साथीमुळे चार जणांचा मृत्यू झाला. तर, ४३५ रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी, नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांना कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यांची त्य प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना घरीच वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये, सरकार आणि आरोग्य विभाग लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील २६, ठाण्यातील ९, नवी मुंबईतील ६, पुण्यातील २७ पिंपरी-चिंचवडमधील ३. कोल्हापूरमधील २, सांगलीत ५ रुग्ण आहे. दिलासादायक बातमी बातमी अशी अशी आहे की ४३५ रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत आणि रुग्णालयातून घरी परतले आहेत. यासह, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता ५९० वर आली आहे. त्याच वेळी, सोमवारी ३६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

नागपुरात कोरोनाच्या दोन रुग्णांचा इतर आजारांमुळे मृत्यू झालाय. नागपुरात हे दोन कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते. यातील एकाचा क्खत आणि क्षय रोगानं तर दुसऱ्या रुग्णाचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झालाय. नागपुरात आतापर्यंत कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले असून यातील ११ जणांनी कोरोनावर मात केलीये. तर ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर गेलीय. यात महापालिका हद्दीतील ७ आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील हे रुग्ण सध्या शहरात वास्तव्यास असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली. कोरोनाचा नवा विषाणू वेगाने पसरत असल्याने राज्यातील रुग्णालयांनी आवश्यक सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतील कामा रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी ३० खाटांचा रुग्ण कक्ष उभारला आहे. या कक्षामध्ये जीवनरक्षक प्रणाली, प्राणवायूपुरवठा यंत्रणा, निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular