25.8 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा, लांबलचक रांगा

रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा, लांबलचक रांगा

गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते.

ऐन सुट्टीच्या हंगामात सीएनजीचा तुटवडा भासत असल्याने रिक्षाचालकांसह अन्य वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गेले पंधरा ते वीस दिवस ही परिस्थिती आहे. जिल्ह्यात सीएनजीवर चालणारी एकूण ८ हजार ७१७ वाहने आहेत. गॅस पंपावर उपलब्ध झाल्यानंतर तो भरण्यासाठी सीएनजी वाहनधारकांना दोन ते तीन तास रांगेत राहावे लागत आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरीत दाखल होत आहेत.

पर्यटक रणरणत्या उन्हामध्ये रिक्षा किंवा छोट्या मोटारी भाड्याने घेऊन पर्यटन करतात. हाच हंगाम रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रवासी भाडे मिळण्याचा आहे; परंतु ज्या रिक्षा सीएनजीवर चालतात त्या रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यात अडचणी येत आहेत. सीएनजी पंपावर मुबलक गॅस उपलब्ध नाही. गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते. त्यामुळे वेळेत रिक्षा व्यवसाय करता येत नाही.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील नोंदीनुसार वाहनांची संख्या ४ लाख ४१ हजार ७२ वाहने आहेत. त्यामध्ये ३ लाख १२ हजार ९७० दुचाकी वाहनांचा समावेश आहे. म्हणजेच प्रत्येक घरात १ ते २ दुचाकी असल्याने रिक्षा व्यवसाय थंडावला. तरीही सणासुदीच्या दिवसांसह मे महिन्यात चाकरमानी, पर्यटक रत्नागिरीत येतात तेव्हा रिक्षा व्यवसाय बऱ्यापैकी होतो. आता मे महिना असतानाही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular