27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा, लांबलचक रांगा

रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा, लांबलचक रांगा

गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते.

ऐन सुट्टीच्या हंगामात सीएनजीचा तुटवडा भासत असल्याने रिक्षाचालकांसह अन्य वाहनधारकांची गैरसोय होत आहे. गेले पंधरा ते वीस दिवस ही परिस्थिती आहे. जिल्ह्यात सीएनजीवर चालणारी एकूण ८ हजार ७१७ वाहने आहेत. गॅस पंपावर उपलब्ध झाल्यानंतर तो भरण्यासाठी सीएनजी वाहनधारकांना दोन ते तीन तास रांगेत राहावे लागत आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरीत दाखल होत आहेत.

पर्यटक रणरणत्या उन्हामध्ये रिक्षा किंवा छोट्या मोटारी भाड्याने घेऊन पर्यटन करतात. हाच हंगाम रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रवासी भाडे मिळण्याचा आहे; परंतु ज्या रिक्षा सीएनजीवर चालतात त्या रिक्षा चालकांना व्यवसाय करण्यात अडचणी येत आहेत. सीएनजी पंपावर मुबलक गॅस उपलब्ध नाही. गॅस उपलब्ध झाल्यानंतर तो रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत राहावे लागते. त्यामुळे वेळेत रिक्षा व्यवसाय करता येत नाही.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडील २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील नोंदीनुसार वाहनांची संख्या ४ लाख ४१ हजार ७२ वाहने आहेत. त्यामध्ये ३ लाख १२ हजार ९७० दुचाकी वाहनांचा समावेश आहे. म्हणजेच प्रत्येक घरात १ ते २ दुचाकी असल्याने रिक्षा व्यवसाय थंडावला. तरीही सणासुदीच्या दिवसांसह मे महिन्यात चाकरमानी, पर्यटक रत्नागिरीत येतात तेव्हा रिक्षा व्यवसाय बऱ्यापैकी होतो. आता मे महिना असतानाही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular