29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeSportsटी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे.

टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा वर्ल्ड कप संघातून बाहेर झाला आहे. त्यांच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. आशिया कपमध्ये त्याला दुखापत झाली होती. जडेजा संघाबाहेर गेल्याने भारतीय संघ रुळावरून घसरला आणि सलग दोन सामने गमावून आशिया चषकातून बाद झाला.

टीम इंडियाने पहिला वर्ल्ड कप २००७ मध्ये जिंकला होता. त्यावेळी पहिल्यांदाच ही मेगा टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. यानंतर ही मेगा टूर्नामेंट ६ वेळा आयोजित करण्यात आली असून आम्ही एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-२० संघ असा आहे. रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक हुडा चहर आणि जसप्रीत बुमराह आहेत.

तर दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय टी-२० संघ अशाप्रकारे आहे. त्यामध्ये रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular