27.2 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiri'दिव्यांगां'ना पेन्शनची प्रतीक्षाच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडेही शासनाचा कानाडोळा

‘दिव्यांगां’ना पेन्शनची प्रतीक्षाच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडेही शासनाचा कानाडोळा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात सरकारने शेकडो निर्णय घेतले.

दिव्यांग कर्मचाऱ्यांची सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांची पेन्शन अद्यापही जमा झालेली नाही. त्यामुळे दिव्यांगांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गणपतीप्रमाणेच दिवाळीमध्येही त्यांना पेन्शनची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जिल्ह्यात जोरात आहे. निवडणुकीपूर्वी ही योजना तळागाळात पोचविण्यासाठी आचारसंहितेपूर्वी सरकारने आणि शासनाने कडक भूमिका घेतली होती. तसे असले तरीही दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. गणपती गेले, दिवाळी आली तरीही पेन्शनची दिव्यांगांना प्रतीक्षाच आहे. मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचीही दखल शासनाने न घेतल्यामुळे नाराजीत भर पडली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसात सरकारने शेकडो निर्णय घेतले. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्याची पेन्शन जमा करण्याविषयी कानाडोळा केला गेला. केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, सहायक उपकरणांसाठी मागील सहा वर्षांपासून थकित असलेले अनुदान व अनुशेष, पदोन्नती या मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलनही केले. त्याची दखल न घेतल्यामुळे दिव्यांग कर्मचारी संतापलेले आहेत, असे दिव्यांग समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular