25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRajapurअणुस्कुरा घाटाचे सौंदर्य खुलले

अणुस्कुरा घाटाचे सौंदर्य खुलले

उन्हाळ्यात रूक्ष वाटणारा अणुस्कुरा घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे.

कोकण आणि घाटमाथा यांना जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाला विविध कारणांनी विशेष महत्त्व आहे. तालुक्याचा पूर्व भाग असलेला पाचल परिसर कुशीमध्ये घेणारा अणुस्कुरा घाट विविधतेने नटलेला सध्या निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघालेला असून येथील निसर्गसौंदयाचा आस्वाद घेण्यासाठी सध्या तो पर्यटकांना साद घालत आहे. उन्हाळ्यात रूक्ष वाटणारा अणुस्कुरा घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात खुलले आहे. घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आणि घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतही पाहताना घाटाच्या पायथ्याशी स्वर्ग अवतरल्याचा भास होतो.

सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये असलेल्या अनेक दुर्मिळ वन्यजीव, प्राण्यांना पाहण्याचीही अनोखी संधी मिळते. अणुस्कुरा घाटाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा या ठिकाणी अभाव आहे. पर्यटकांना राहण्यासाठी चांगली लॉजिंग, हॉटेल्स, पर्यटकांना घाटाची माहिती देणारे गाईड, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी गाड्यांची सुविधा यांची या ठिकाणी वानवा आहे. या साऱ्या सुविधा उपलब्ध झाल्यास अणुस्कुरा घाट पर्यटकांसाठी वेगळीच मेजवानी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular