28.1 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यात १ लाख ४३ हजार कार्डाचे झाले वाटप

जिल्ह्यात १ लाख ४३ हजार कार्डाचे झाले वाटप

जिल्ह्यातही ५ लाख ५ हजार ३९७ पात्र लाभार्थी आहेत .

आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आजतागायत संपूर्ण देशात २५ कोटी आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातही ५ लाख ५ हजार ३९७ पात्र लाभार्थी असून, त्यापैकी १ लाख ४३ हजार ८८५ लाभार्थ्यांना कार्ड वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या कार्डसाठी लवकारात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड आशावर्कर, खासगी कॉमन सर्व्हिस सेंटर वा ग्रामपातळीवरील केंद्रचालक, आपले सरकार केंद्र, स्वतः लाभार्थी कार्ड काढण्यासाठी रेशनकार्ड व त्याचबरोबर १२ अंकी ऑनलाईन रेशनकार्ड नंबर, आधार कार्ड व आधार कार्डाला लिंक असलेला मोबाईल नंबर, स्वतः लाभार्थी, नवीन लग्न झाल्याचे नाव, नवीन जन्म झालेल्या शिशूचे नाव घालण्यासाठी अपडेट रेशनकार्ड, विवाह प्रमाणपत्र, प्रधानमंत्री लेटर, जन्म प्रमाणपत्राप्रमाणे कुटुंब यादी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular