26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriआर्थिक व्यवहारातून तरुणावर हल्ला, केले कोयतीचे सपासप वार

आर्थिक व्यवहारातून तरुणावर हल्ला, केले कोयतीचे सपासप वार

अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये नागेश गंभीर स्वरुपात जखमी झाल्याने त्याला स्थानिकांनी नागेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रत्नागिरी शहरातील पऱ्यांची आळी येथे तीन ते चार तरुणांनी एका तरुणाच्या डोक्यात लादी घालून आणि त्यानंतर धारदार कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि  हातावर वार केले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. नागेश प्रकाश गजबार वय २७ रा. कुवारबाव, असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे;  परंतु भर बाजारपेठेत अशा प्रकारचा गंभीर हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जखमीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणाऱ्या नागेशला काही तरुणांनी फोन करून शहरातील पऱ्याची आळी येथे बोलावले. कॉंग्रेस भुवन नजीकच्या प्रभा हॉटेलच्या निमुळत्या गल्लीमध्ये हा प्रकार घडून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बोलवणारे तीन ते चार तरुण हे त्याच्याच परिचयातील होते, परंतु नागेश पऱ्याची आळी येथे आल्यानंतर त्यातील एका तरुणाने थेट त्याच्या डोक्यात लादी घातली. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. त्यानंतर त्या तरुणानी घटनास्थळावरून पलायन केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये नागेश गंभीर स्वरुपात जखमी झाल्याने त्याला स्थानिकांनी नागेशला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासह घटनास्थळी पाहणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते; परंतु हल्लेखोर रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांना सापडले नाहीत. त्यांचा शोध पोलीस कसोसीने घेत आहेत. या घटनेने रत्नागिरी शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular