28.8 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriभावनिक आवाहनाला बळी पडू नका - मंत्री रवींद्र चव्हाण

भावनिक आवाहनाला बळी पडू नका – मंत्री रवींद्र चव्हाण

भावनिक आवाहन करणाऱ्यांनी कोकणासाठी काय केले, केंद्राच्या मदतीने काय मिळवून दिले, ते जनतेला सांगावे.

भावनिक आवाहन करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचे काम करणाऱ्या विरोधकांनी केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून १० वर्षांमध्ये कोकणाला काय मिळवून दिले ते सांगावे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सर्व घटकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासह देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. नरेंद्र मोदी हे एक मॅजिक असून, मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राहिलेल्या ३५ दिवसांमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत करून घराघरांत जाऊन मोदी यांचे कार्य पटवून द्यायचे आहे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

सावरकर नाट्यगृहात आयोजित बूथ कार्यकर्ता सुपर वॉरिअर्स संमेलनात ते बोलत होते.  या वेळी आमदार नीतेश राणे, लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले, “लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार “निवडून देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. आपल्या भागांमध्ये, नावामध्ये, वस्तीत, शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि परिवारापर्यंत पोहोचण्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. विरोधकांच्या भावनिक आवाहनाला कोणी बळी पडू नका.

भावनिक आवाहन करणाऱ्यांनी कोकणासाठी काय केले, केंद्राच्या मदतीने काय मिळवून दिले, ते जनतेला सांगावे.”मोदी काय आहे, हे जनतेपर्यंत गेले पाहिजे. नरेंद्र मोदी हे भाजपमध्ये १५ वर्षे प्रचारक होते. त्या माध्यमातून देशभर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर संघटनात्मक पदाधिकारी झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी मॅजिक काय आहे, हे आता विरोधकांना दाखवून द्या. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोबाईल चार्ज करावा लागतो तसे लोकांना चार्ज करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular