26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunमहामार्गावर सीएनजी पंपांची कमतरता, चाकरमान्यांची वाढती मागणी

महामार्गावर सीएनजी पंपांची कमतरता, चाकरमान्यांची वाढती मागणी

रायगडपासून रत्नागिरीपर्यंत केवळ ११ सीएनजी पंप आहेत.

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजीवर चालणारी वाहने खरेदी केली जातात; मात्र, सीएनजी पंपांची कमतरता आहे. त्यात मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकदा सीएनजी संपले आहे असेच फलक पंपावर लावलेले दिसत असतात. मुंबई-पुण्यातील चाकरमानी सीएनजीवर चालणारी वाहने घेऊन गावी आल्यामुळे सीएनजीच्या मागणीत वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्याचबरोबर कोकणात सुट्यांसाठी चाकरमानी देखील येत आहेत.

या सर्व वाहनचालकांना मुंबई- गोवा महामार्गावर सीएनजीअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी पंपांवर कधीकधी तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यातच सीएनजी संपल्यास रांगेत उभ्या असलेल्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रायगडपासून रत्नागिरीपर्यंत केवळ ११ सीएनजी पंप आहेत. त्या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी अर्घा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पंपावर सीएनजी उपलब्ध झाल्यानंतर पंपचालक सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून त्याची माहिती स्थानिक वाहनचालकांना देतात.

RELATED ARTICLES

Most Popular