27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRatnagiriकोकणातील कोरोनाविरहीत एक गाव

कोकणातील कोरोनाविरहीत एक गाव

एकीच्या बळावर आणि वेळोवेळी करणाऱ्या जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.

सध्या जगभरामध्ये कोरोनाचा वाढता संसर्गाचे वृत्त पसरले आहे. त्यामुळे अगदी लहान गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत विशेष काळजी घेतली जात आहे. चाकरमानी कोरोनाच्या भीतीमुळे गावाकडे वळू लागले आहेत. आपल्या गावच्या वेशीबाहेरचं कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना स्थानिक स्तरावर आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि गावकरी एकत्रित मिळून करत आहेत. तरीही कोरोनाचा शिरकाव कोणत्या ना कोणत्या मार्गाने होतोचं आहे. गेल्या वर्षभर कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक गाव आणि शहर एकत्र मिळून लढा देत आहेत. गेल्या वर्षभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे लक्षण दिसत नाही.

जगभर असलेला कोरोनाचा विळखा बघता गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण नाही हे ऐकायला मिळाले तर नवलच म्हणायचे. परंतु, हे सत्य असून हे करून दाखवले आहे कोकणातील एक गावाने. चिपळूण तालुक्यातील आगवे गाव आहे जिथे सगळीकडे कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत दिसताना या आगवे गावाने मात्र कोरोनाला अजूनही गावात संक्रमण करू दिले नाही. अद्याप या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमाअंतर्गत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये कोरोन विरहीत गाव म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील आगवे ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले आहे. एकीच्या बळावर आणि वेळोवेळी करणाऱ्या जनजागृतीच्या आधारे संपूर्ण गाव कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. आगवे गावामध्ये ग्रामपंचायतीची कामेसुद्धा एकत्रितरीत्या येऊन केली जातात. या गावात असणारी एकी मोठी ठरली असून, त्याचा फायदा या कोरोनाच्या भयंकर परिस्थिती काळामध्ये झाला आहे. फ्रंट वर्क्रसनी वेळोवेळी घरोघरी फिरून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक तापमान व ऑक्सिजन लेवल मोजत प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती घेतली.

आज या गावाने कोरोनाच्या लढ्यात यश मिळविले आहे ते नेहमीच्या सवयीत बदल करून नवीन जीवनशैली आत्मसात करावी लागली. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या  संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेचे फार मोठे साहाय्य झाले. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीने कोरोनाचे केलेले गावामधील सर्वेक्षण, कोरोनाची चाचणी, गावासाठी मदत केलेल्या विविध सेवाभावी संस्था,  विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मिळलेला निधी आणि साहित्य, कोरोनामुळे झालेला मृत्यू, सारी चे रुग्ण इत्यादी निकषांवर आधारित अव्वल तीन ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. त्यामध्ये शासनातर्फे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ स्तरावर हा गौरव करण्यात आला. यामध्ये चिपळूण मधील आगवे गावाने पहिला  क्रमांक पटकाविला. आमदार शेखर निकम यांच्या हस्ते या ग्रामपंचायतीला रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular