24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजिल्हयाला अवकाळी पावसाचा तडाखा, भातशेतीचे मोठे नुकसान

जिल्हयाला अवकाळी पावसाचा तडाखा, भातशेतीचे मोठे नुकसान

शुक्रवारी सकाळी देखील काही ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त हाती आले आहे.

ऐन दिवाळीत रत्नागिरीच्या ग्रामीण भागासह चिपळूण आणि खेडला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीला तर फटका बसला आहेच त्याचप्रमाणे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक देखील धास्तावले आहेत. जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे. रत्नागिरी कमी अधिक प्रमाणात अवकाळी शहरात बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस पडला. तर गुरुवारी रात्री पावस परिसराला या पावसाने झोडपले. शुक्रवारी सकाळी देखील काही ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त हाती आले आहे.

चिपळुणला झोडपले – गुरुवारी रात्री चिपळुणमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. मेघगर्जनेसह वीजाही चमकत होत्या. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे तसेच पाताच्या उडव्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चिपळूणशात आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

खेडमध्येही पाऊस – खेडमध्ये देखील गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी सकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्याचा परिणाम बाजारपेठेतील दिवाळी खरेदीवर झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात भातशेती कापणीची लगबग सुरू असताना तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आंबवली या बंदरपट्ट्यात सलग ३ दिवस दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळत आहे. भातशेतीची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. कापून ठेवलेले भात भिजले आहे. आंबवली, वरवली, सणघर, नांदिवली, वडगांव आदी भागात पावसाने भातशेतीचे नुकसान केले असल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.

खेड शहरालाही फटका – खेड शहरालाही पावसाचा फटका बसला आहे. गणपती नंतर मंदावलेली खेडची बाजारपेठ दिवाळी खरेदीमुळे उजळली होती. मात्र शुक्रवारी दुपारी पावसाने जोरदार सुरुवात केल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने बाजारातील खरेदीवर परिणाम झाला असून एक दिवसांवर आलेल्या दिवाळीची खरेदी करण्यास नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

दापोली, मंडणगडमध्येही पाऊस – गुरुवारी रात्री दापोली, मंडणगडमध्येही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त हाती आले आहे. दापोली शहरात कोसळलेल्या पावसाने पर्यटकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. तर ग्रामीण भागात भातशेतीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

आंबा उत्पादक भास्तावले – या अवकाळी पावसाचा आंबा पिकावर तर परिणाम होणार नाही ना, या भीतीने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. आंब्याचा हंगाम आत्ता कुठे सुरु होतो आहे. तोच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे. दिवाळीच्या आनंदावरही कुठेतरी विरझण पडताना दिसते आहे.

RELATED ARTICLES

Most Popular