26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीत ९६ एकरवर 'इको टुरिझम' उभारणार - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीत ९६ एकरवर ‘इको टुरिझम’ उभारणार – पालकमंत्री उदय सामंत

आरे-वारे येथील ९६ एकर जमिनीवर इको टुरिझम विकसित केले जाणार आहे.

पथदर्शी प्रकल्प म्हणून माध्यमिक शाळांतील मुलींसाठी प्रत्येक तालुक्यात ५ याप्रमाणे “फुलराणी कक्ष” उभारण्यात येणार आहेत. राज्यातील हा पायलट प्रोजेक्ट आहे तसेच अभियांत्रिकी महाविद्यायलाच्या परिसरात सुसज्ज १० कोटीचे सभामंडप (ऑडिटोरियम) उभे करण्यात येणार आहे. आरे-वारे येथील ९६ एकर जमिनीवर इको टुरिझम विकसित केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, खैर लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत रोपे दिली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना वनखात्याला दिल्या आहेत.

सद्यःस्थितीत असणारी १ लाख रोपे शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी त्यांची नोंदणी करून घ्यावी आणि जिल्ह्यात खैर लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अधिकारी आणि रत्नागिरीकर यांच्यासाठी रत्नागिरी क्लब उभारण्याची सूचनाही दिली आहे. त्याचे सदस्यत्वाची नोंदणी लवकरच होणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १० कोटींचे सुसज्ज ऑडिटोरियम उभे करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन केले आहे तसेच प्रातांधिकाऱ्यांनी रत्नागिरी क्लब निर्मिती करावी. त्यामधील अद्ययावत जिमसाठी ५० लाख रुपये देण्याची सूचनाही पालकमंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना केली.

शासकीय पत्रकार भवन – एमआयडीसीच्या माध्यमातून ३ गुंठे जागा देऊन त्या ठिकाणी शासकीय पत्रकार भवन उभारले जाणार आहे. त्यासाठी चालू वर्षी १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. एमआयडीसीच्या बोर्ड मीटिंगमध्ये याबाबतचा निर्णय झाला. नाममात्र भाडेतत्त्वावर ही जागा दिली जाणार आहे. ती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करावा. भवन उभारले जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular